Thursday, June 26, 2008

कोकण- परशुरामाची भूमी

सगळॆ जण मराठी भाषा वाचवुच्या मागावर असत. आता जर मराठीचोच प्रसार करुचो लागता हा तर मगे मालवणीची काय कथा तीचो कोण वाली उरतलो. तो एक मच्छीन्द्र काम्बळी होतो.. तोव रवलो नाय. त्याना मालवणी नाटका काढुन भाषेचो प्रसार केल्यान. आता मालवणी लोकान्काच मालवणीचो प्रसार करुक व्ह्ययो। तेच्यासाठीच ह्यो प्रपन्च करतय. रोज थोडातरी मालवणीत लिहुचा असा ठरवलय...

मालवणी ही कोकण प्रान्ताची बोलीभाषा असा। थोडीफ़ार कोकणी भाषेसारखीच हा। कोकणी ही गोयात बोल्लीजाता. कोकण म्हणजे परशुरामाची भूमी. परशुरामान ही भूमी वसवली हा.
परशुराम ह्यो जमदग्नी रुषीन्चो धाकटो मुलगो. त्यान्का तीन मुलगे. जमदग्नी रूषीन्ची पत्नि खूप पतीव्रता होती. ती एवढी पुण्यवान की पतीला पूजेक लागणारा पाणी ती पदरातून हाणी. एकदा ती नदीवर गेल्ली असता थय गन्धर्व पण इले होते. तेव्हा तीच्या मनाकडे फ़क्त इला की किती सुन्दर असत. बस॥ येवढाच कारण आणी तीच्या पदरात पाणी येइना. इकडे जमदग्नी रूषीनी ही अजुन कशी इली नाय म्हनुन ध्यान लावल्यानी. आणी त्यान्का सगळा समजला. पत्नी रिकाम्या हातान घरी इली. रूषीनी आपल्या पयल्या मुलाक आद्न्या केल्यानी कि हिचो शीरच्छेद कर. मात्रुहत्येचा पाप लागात म्हणून तो तयार होइना. दुसरो मुलगोव असोच तयार होइना. तेव्हा त्यानी परशुरामाक आद्न्या केली. परशुरामाने आइची माफ़ी मागुन तीचो शीरच्छेद केलो. जमदग्नी तेच्यावर प्रसन्न झाले नी त्यानी त्याका वर मागुक सान्गल्यानी. तेव्हा परशुरामान आइक आणि भावान्का परत जिवन्त करुन घेतल्यान. पण मात्रुह्त्येचा पाप त्याका लागला ता लागलाच. असे म्हणतत की ता पाप परशुरामाच्या ह्या भूमीकव लागला हा. म्हणुन कोकणाचो विकास होत नाही हा. पण आता सरकारने कोकणाचो विकास करुचो मनावर घेतल्यान हा बघु आता काय होता ता...

Wednesday, June 25, 2008

केकावली

माझ्या आईने आम्हाला एक छान कविता शिकवली आहे. मयुरपन्तान्ची केकावली म्ह्नणून ती प्रसिद्ध आहे.बहुतेक जणाना केवळ पहिली ओळ माहीत असावी.
सुसन्गती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ।
कलन्क मतीचा झडॊ विशय़ सर्वथा नावडॊ ॥
सद्न्ग्री कमळी दडॊ मुरडीता हटाने अडॊ ।
वियोग घडता रडॊ मन भव: चरीत्री जडॊ ॥
न निश्चय कधी धळॊ कुजन विघ्न बाधा टळॊ ।
न चित्त भजनी चळो मतिस्दुक्त मार्गी वळो ॥
स्व तत्व ह्र्दया कळॊ दुरभीमान सारा गळॊ।
पुन्हा न मन हे मळॊ दुरित आत्म बोधे जळॊ॥

Monday, June 23, 2008

फुलांची दुनिया

आमच्या झाडाला आलेल्या फुलांचे फोटो ....

ही लिली ची फूले आहेत

फुलांचा राजा गुलाब शोभतो खरा

भजन

माझी आज्जी एक खुप गोड भजन म्हणायची ॥ खुप जुने भजन आहे ते आणि त्याची चाल पण एवढी गोड आहे ना ॥
आवडीने भावे हरी नाम घेसी , तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।। दृ ॥
ठेविले अनंते तैसेची रहावे , चित्ती असो द्यावे समाधान ।
राहिल्या उदेवेग दुखची केवल , भोगणेटी ते फळ संचिताचे
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा , पति लक्ष्मीचा जानतसे।
सकल जीवांचा करितो साम्भाल, तुज मोकलिल ऐसे नाही
जैसी स्थिति आहे , तैशापरी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा , हरी कृपे त्याचा नाश आहे॥
छानआहे न रोज तुम्हीही हे गाऊ शकता

Thursday, June 19, 2008

लग्न

असे म्हणतात की लग्न पाहावे करून । लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन। दोन कुतुम्बानचा सम्बन्ध । आणि बरेच काही । आता लग्न या विषयावर मी बापडी काय बोलणार ॥ पण लग्न करण्याच्या बाबतीत मी एवढे काही टक्के तोपने खाल्ले आहेत की बस रे बस ।
आधी लग्नाच्या बाजारात स्वताला नित प्रेजेंट करा त्यासाठी वेग वेगळ्या पोज़ मध्ये फोटो काढा मग स्वत बद्दल निबंध लिहा। वेग वेगळ्या मंडलातन नाव नोंदवा सर्व नातेवईकानकड़े बायो डेटा दया
मग एक एक जन स्थल सुचावानार । पण सुचवताना ते स्थल ज़रा तरी जूलनारे असावे पण नाही बरेकाही बोलावे तर बोलणार मुलीची जात कुठेतरी एडजस्ट करावेच लागणार म्हणजे काय मुलीने अपेक्षाच ठेऊ नए

आता माझे लग्न अजुन नाही झाले तर लोकाना याचा काय बरे त्रास व्हावा । लग्न म्हणजे अशी गोष्ट आहे की एखाद्याच्या लग्नाचा समाजाला ना काही फायदा होत ना काही तोटा पण याच समाजाला प्रत्येकाच्या लग्नाची भारी चिन्ता असते। जर कोणी गैर काम करत असेल तर कोणी जाउन त्याला विचारत नाही की का रे बाबा असे का करतो असे करू नए कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याचा समाजावर परिणाम होतो पण कोणी जाउन भर रस्त्यात त्याला कोणी विचरते का की काय म्हणुन तू पैसे खातोस पण जर एखाद्याचे लग्न झाले नसेल तर हां समाज हात धू उन त्याच्या मागे लागतो। येता जाता , कुठेही रस्त्यात विचारणार मग लग्न कधी करताय लग्न बिग्न करायचे आहे की नाही आणि जर का मुलीचे लग्न होत नसेल तर मग काही विचारू नका हा हिचिच नाटके असणार आणि अशा कमेंट्स मला माझ्या जन्रेशंच्या मुलान कडून च मिलाल्या आहेत हे आशार्य असो आता माझे लग्न होईपर्यंत ये दुनिया मुझे चैनसे जीने नही देगी

वेंगुर्ले - आख्यीका

खुप खुप वर्षांपूर्वी वेंगुर्ले हे गाव अस्तित्वात नव्हते। या गावापासून जवलचअसलेल्या अनसुर या गावी श्री सातेरी देवीचे मन्दिर होते। हे मन्दिर मूल भूमिकेचे मन्दिर म्हणुन ओलखले जाई । या मंदिराचे सर्व अधिकार हे परब आणि गावडे या कुतुम्बंकडे होते। तर या परब कुतुम्बमाधिल एक श्रद्धालु नेहेमी दहा दहा मैल चालत देवीच्या दर्शनाला जाई। वृधाप्कालाताही त्याने हा शिरस्ता मोडला नाही । त्याच्या भक्तिवर श्री सातेरी देवी प्रसन्न झाली आणि तीने त्याला दृशांत देऊन आश्वासन दीले की ती त्याच्या घराजवल येउन राहील।
तो श्रद्धालु भक्त पुन्हा आपल्या घरी निघाला तेव्हा त्याला आपल्या घराजवल एक पाषाणजमिनीपासून उगवताना दिसला आणि तो पाषाण आकाराने वाढतच होता। तेव्हा या परबाने त्या पाषानाला घट्ट मिठी मारली आणि देवीला गाराने घातले की त्याने देवीला ओलखले आहे नि आता तिने वाढायचे थाम्बवावे आणि येथेच वास्तव्य करावे। हेच ते स्थान आहे जे आता श्री सातेरी देवीचे स्थान म्हणुन ओलखले जाते।
या अख्यायिके वरून या गावाला वेंगुर्ले हे नाव मिळाले। या गावाची बोलीभाषा मालवणी , तर मालवनित वेंग म्हणजे मिठी आणि उरले म्हणजे उरलेले । वेंगेत उरलेले म्हणुन वेंगुर्ले।
तर असे हे माझे गाव जे अस्तित्वातच आले मुळी परबाच्या श्री सातेरी देवी वरील भक्तिमुले आणि देवीच्या आशिर्वदामुले।
या गावावर असलेला देवीचा वरद हस्त येथील निसर्ग समृधतेतुं जाणवतो। येथे पिकनारे काजू सुप्रसिद्ध आहेत।
या गावावारिल डच संस्कृतीचा प्रभाव जागोजागी जाणवतो । येथे डच लोकानी वसाहत केलि होती। त्यानी या गावत बर्याच सुधारना केल्या। त्यानी बांधलेले मार्केट खुपच चान आणि प्रशस्त आहे। येथे सर्व प्रकारच्या वस्तु , ताजा भाजीपाला, काजू, काजुचे वेग वेगले प्रकार विकायला ठेवलेले मिलातात। ओले काजू, सुके काजू। भाजलेले काजू। मीठ लावलेले काजू। मसाला काजू आणि बरेच काही।
वेंगुर्ले बंदरावर एकदम ताज़ी आणि मोठी मासली अगदी स्वस्त दरात मिलते। वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा खुपच नयनरम्य आहे। त्यासाठी इथे एकदा यावेच लागेल।
आणि ही बरेच काही लिहिण्या सारखे आहे पण ते सर्व पुड्च्या भागात
आता आवरते घेते।

Wednesday, June 18, 2008

माझे गाव - वेंगुर्ले

जर कश्मीर हा भारताचा स्वर्ग असेल तर कोकण हा महाराष्ट्राचा स्वर्ग आहे आणि कोकण चा स्वर्ग म्हणजे वेंगुर्लेच ।

खोटे वाटत असेल तर खालील फोटो पहा



































आहे की नाही सुंदर मग कधी येता माझ्या गावाला ॥


















Monday, June 16, 2008

लिखाण

मला नेहेमी वाtaय्चे की काहीतरी लिहावे अर्थात मराठीत तसे मी कही खु छान नही लिहित पं इक हॉउस बाकि कही नही ॥ जे मानत विचार येतात ते लिहून ठेवायाचे येवाधाच।

आता ब्लॉग तर सुरु केले बघू उत्साह किती दिवस तिकतो ते।

हिन्दी फॉण्ट असल्याने पुर्नाविरमा ऐवागी डंडी आहे।

लिखाण

श्री गणेशा

श्री गणेशाय नमः
श्री साईनाथाय नमः
श्री सातेरी कुलदेवताय नमः
आजपासुन ब्लोग लिहायला सुरुवात करते आहे यश मिलावे अणि लिखाण कायम चालू रहावे ही इश्वार्चारानी प्रार्थना