खूप दिवसानी सहलीला जायचा योग जुळुन आला। जवळच अलिबागला जायचे ठरले। आम्ही तीस- चाळीस जण होतो। सकाळी सहा वाजता दादरला भेटायचे होते। पाऊस तर अगदी मी म्हणत होता। मला तर वाटले सहल रद्द होते बिते की काय॥ पण सगळ्याचे इरादे अगदी पक्के होते। आणि आम्ही बसमध्ये बसलो।
जाताना निसर्ग सौद्र्य काय बघाल॥ सगळीकडे हिरवळच हिरवळ. जिकडे पाहावे तिकडे हिरवाई पसरलेली त्यात पावसाची सन्तत धार.. एकूणच वातावरण एकदम रोमान्टीक होते. साधारण साडे अकरा वाजता आम्ही आवास बीचवर पोहोचलो. तिथे आमची सोय एम. टि. डी. सी. च्या होलीडे होम मध्ये करण्यात आली होती. आम्ही पोहे आणि चहा पीऊन समुद्रावर निघालो. किनारयावर खूप मस्ती केली. पाण्यात डुम्बलो. वेळ कसा गेला कळलेच नाही. आता पोटात कावळे ओरडायला सुरूवात झाली होती. पण समुद्रावरून पाय निघेना. दुपारचे तीन वाजले होते. आणि सडकून भूकही लागली होती. जेवणावर मस्त ताव मारला. साधारण चार वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. आणि रात्री मुम्बइला पोहोचलो.
No comments:
Post a Comment